Saturday, September 28, 2013

काय आहेत मुलांचे अधिकार ?

काय आहेत मुलांचे अधिकार ?

संयुक्त राष्ट्र परिषदेने २० नोव्हेंबर रोजी पारित केलेल्या बाल हक्क संहितेनुसार एकूण ५४ अधिकारांना चार प्रमुख अधिकारांमध्ये विभागले आहे ते आहेत  पुढीलप्रमाणे :-

जगण्याचा हक्क :- पहिला महत्वाचा हक्क आहे तो जगण्याचा. गर्भावस्थेत आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला हा मुलभूत हक्क आहे. जन्म झाल्यानंतर स्वताचे अस्तित्व असण्याचाही मुलांना हक्क आहे म्हणूनच प्रत्येक मुलाला स्वताचे नाव, पत्ता, आणि राष्ट्रीयत्व आहे. प्रत्येक जन्माची नोंद व्हायला हवी. यालाच सलग्न म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या सर्वाचा हक़्क़ कुटुंबात राहण्याचा आई वडिलांसोबत राहण्याचा हक्क स्वछ हवा , स्वच्छ पाणी , वैद्यकीय सुविधा आपले बालपण सुरक्षित वातावरणात घालवण्याचा हक्क असे सर्व हक्क जगण्याच्या हक्कांशी संबंधित आहेत. निरनिराळ्या तऱ्हेच्या संकटात आपत्तीत किंवा कठीण परिस्थितीत सापडलेल्या मुलांचा हा मुलभूत हक्क डावलला जाऊ शकतो. जसे:-


संकटे /कठीण परिस्थिती
नैसर्गिक :-          दुष्काळ, महापूर, भूकंप
आर्थिक/सामाजिक :-  गरिबी, मुलगा हवा या अट्टाहासामुळे मुलीचा हक्क नाकारणे
युद्ध :-             दंगे
परिस्थिती :- अनाथ  निराधार, बाल वेश्या , रस्त्यावर राहणारी मुलं ,                           काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी सर्व मुलं

विकासाचा हक्क :- मुलांचा सर्वागीण विकास व्हावा या साठी अनेक गोष्टींची आवशक्यता असते जसे:-
  • ·         शारीरिक
  • ·         मानसिक
  • ·         बौद्धिक
  • ·         सामाजिक

या चार उपविभागांमाध्येही अनेक गोष्टींचा समावेश होतो.आणि हे चारही उपविभाग उत्तम विकासासाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये पहिला /दुसरा अशी  प्राथमिकता करता येत नाही प्रत्येक मुलाला प्रत्येक विषयाच्या सर्व संधी मिळावयास हव्यात. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना आपले कार्यक्रम योजताना या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे.

सहभागाचा हक्क :- अनेकदा लहान मुलांना आपण नासमज अडाणी समजतो, पण प्रत्येक मुलाला स्वताचे व्यक्तिमत्व असते. स्वताचे विचार मत असतात आणि ते  विचार मांडण्याचा त्यांना हक्क आहे.त्यासाठी मोठ्या व्यक्तींना स्वता मध्ये बदल करायला हवा , मुलांना काय समजते? त्यांनी फ़क़्त सांगितलेली आज्ञा पाळावयाची ! आज्ञाधारक मुलगा म्हणजे सर्वात गुणी मुलगा असे न मानता आपल्या विचारात बदक करायला हवेत. यासाठी मुलांना मंच उपलब्ध / तयार करून द्यायला हवेत. संधी द्यायला हवी.ही संधी कुटुंबात, शाळेत, गावात, रोजच्या व्यवहारात मिळायला हवी. मुलांच्या संदर्भात प्रत्येक कार्यक्रमात मुलांचा सहभाग वाढवता येतो.आणि केवळ उपस्थित राहून सहभाग देणारी मुलं हळू हळू स्वतः निर्णय घेऊ शकतात. आणि  स्वतंत्रपणे आपलं निर्णय राबविण्यासाठी  कार्यक्रमही घेऊ शकतात. मुलांचा सहभाग वाढविण्यासाठी बाल गट, बालभारती असे कार्यक्रम हाती घेता येतील. किंवा कार्यरत असलेल्या कार्यक्रमांमध्येही मुलांना चर्चेची, संयोजनाची, निर्णयाची जबाबदारी देत देत त्यांचा सहभाग वाढविता येतो.

संरक्षणाचा हक्क :- अनेकदा मुलांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होण्याची शक्यता असते काही वेळा ती मुलगी आहे म्हणून तर काही वेळा अपंग आहे, अनाथ आहे, बाल कामगार आहे म्हणून......


शोषणाची कारणे /प्रकार
शारीरक
मानसिक
लैंगिक
आर्थिक
सामाजिक
          मारणे
            दुर्लक्ष
        प्रत्यक्ष कृतीद्वरे
           गरिबी
उपेक्षित घटक
          इजा करणे
           अपमान
        बोलाण्याद्वारे
          वेठबिगारी
भटके विमुक्त
          उपासमार
           शिव्या
        हावभाव
          बालमजुरी
अनुसूचितजाती


         चित्राद्वारे

धर्मावरआधारित


        भीती दाखऊन



अशा विविध प्रकारचे शोषण थांबावे म्हणून मुलांना संरक्षणाचा हक्क आहे.या सर्व परिस्थितीत मुलांना संरक्षण मिळाले पाहिजे.
अनेकदा मुलांमध्ये भेदभाव केलं जातो . हा भेदभाव –
लिंग आधारित                 मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून.
अपंगत्वामुळे                  शारीरिक किंवा मानसिकरित्या अपंग आहे म्हणून
सामाजिक परिस्थितीमुळे        एका विशीष्ट धर्म / जाती /वंशात जन्मला/ली म्हणून केला जातो.

या सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुलांना संरक्षण मिळावयास हवं.


Friday, September 27, 2013

सोप्पी बाल हक्क संहिता


बाल हक्क संहितेचा इतिहास :-

पहिल्या महायुद्धानंतर जगातील अनेक राष्ट्रांची वाताहत झाली. अनेक मुलं अनाथ झाली. १९२० साली लीग ऑफ नेशन नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाली. राष्ट्र स्तरावर समझोता घडवून आणणे आणि जगात पुन्हा असे महायुद्ध होऊ नये या दृष्टीने उपाय योजने हा या संस्थेचा उद्देश होता. या  आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर १९२४ साली इंग्लंटाइन जेब या ब्रिटीश स्त्री ने बालकांच्या हक्काचे एक पाच कलमी पत्रक मांडले आणि ते मंजूर झाले. त्यानंतर ३५ वर्षांनी १९५९ साली चार्टर ऑफ चिल्ड्रेन्स राईटस् म्हणजेच मुलांच्या हक्काची सनद संयुक्त राष्ट्र परिषदेपुढे मंडळी गेली.आणि तीही मंजूर झाली. या सनदेवर सह्या करणाऱ्या निरनिराळ्या  राष्ट्रांच्या प्रतिनिधिमध्ये भारताचा प्रतिनिधीही होता.
त्यानंतर २० नोव्हेंबर १९८९ रोजी भरलेल्या सर्व साधारण सभेपुढे संयुक्त राष्ट्र परिषदेने बाल हक्काची विस्तृत संहिता मांडली. जमलेल्या अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी मिळून ती मंजूर केली. भारताने ही संहिता ११ डिसेंबर १९९२ साली सही करून मान्य केली.
थोडक्यात मूळ बाल हक्क संहितेचे दोन भाग आहेत.
बालकांचे मुलभूत हक्क
या हक्काचा लाभ सर्व बालकांना मिळावा म्हणून प्रत्येक राष्ट्राने / सरकारने करावयाची कृती.
बाल हक्क संहितेतील मुख्य मुद्दे :-
या संहितेनुसार :- मूळ ‘बाल’ या शब्दाची व्याख्या वय वर्षे १८ पर्यंत करण्यात आलेली आहे. वेगवेगळया राज्यात / देशात वेगवेगळया कायद्यात ‘मुला’ची  व्याख्या काही १२ वर्षे कधी १४ वर्षे तर कधी १६ वर्षे अशी आहे. पण या संहितेनुसार सर्वत्र वय वर्षे १८ पर्यंत अशी व्याख्या मंजूर झालीय.
काही प्रमुख कलमे यांचे प्रत्यक्ष वाचन करणे.
कलम क्र. १,२,३, मुलभूत कलमे.
समजा संपूर्ण संहितेचे वाचन करणं कठीण झाल्यास कमीत कमी खालील कलमे वाचावी आणि चर्चा करावी.
जगण्याचा हक्क                कलम क्र. ६,२४
विकासाचा हक्क                कलम क्र. २८ (शिक्षण) २९
सहभागाचा हक्क               कलम क्र. १२, १३
संरक्षणाचा हक्क                कलम क्र. ३२ (बालमजुरी) ३८,४०
अपंग मुलांसाठी विशेष           कलम क्र. २३.
कलम ६ – जगण्याचा हक्क : प्रत्येक मुलाला जगण्याचा मुलभूत हक्क आहे. हे सर्व राष्ट्रांना मान्य आहे.म्हणून सर्व राष्ट्र मुलं जगतील आणि त्याचा विकास होईल ही काळजी घेईल.
कलम २४- जगण्याचा हक्क : जास्तीत जास्त निरोगी आयुष्य जगण्याचा आणि आजारीपणात वैद्यकीय मदत मिळण्याचा मुलांचा हक्क सर्व राष्ट्रांना मान्य आहे.
कलम २८- विकासाचा हक्क :  सर्व राष्ट्रांना मान्य आहे कि मुलांना शिक्षणाचा हक्क आहे. सर्वाना शिक्षणाची समान संधी मिळावी. शाळेमधील शिस्त राखताना / राबविताना मुलांचा मन राखला जाईल.
कलम २९- विकासाचा हक्क :  मुलांच्या शिक्षणाची दिशा कशी  असावी या बद्दल सर्व राष्ट्रांत एक मत आहे. ती अशी असावी कि ज्यामुळे मुलाची शारीरिक आणि मानसिक शक्ती, त्याचे सुप्त गुण, त्याचे व्यक्तिमत्व याचा विकास व्हावा.
कलम ३२- संरक्षणाचा हक्क : आर्थिक शोषणापासून आणि कोणत्याही  धोकादायक, शिक्षणाच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीच्या आड येणाऱ्या कामापासून संरक्षण मिळण्याचा मुलांचा हक्क सर्व राष्ट्रांना मान्य आहे
कलम ३८ - संरक्षणाचा हक्क : जेंव्हा सशस्त्र लढे होतात तेंव्हा मानवी हक्क आणि माणुसकीची वागणूक या बद्दल जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्यातील मुलांच्या बाबतीतील नियम सर्व राष्ट्र पाळण्याची हमी घेत आहे.
कलम १२- सहभागाचा हक़्क़ : ज्या मुलाला आपली  स्वताची मते बनविण्याची कुवत आलेली आहे त्याला त्याच्या हिता संबंधिच्या सर्व गोष्टीबद्दल मत देण्याचा हक्क आहे.मुलांच्या बुद्धीची कुवत लक्षात घेऊन त्याच्या मताचा विचार केलं जाईल.
कलम १३ - सहभागाचा हक़्क़ : मुलाला आपले विचार प्रगत करण्याचा हक़्क़ आहे सर्व तऱ्हेची माहिती शोधणे अगर इतराना देणे. बोलण्यातून, लिखाणातून आणि चित्रातून माहितीची देवाण घेवाण करणे शक्य आहे..
कलम २३- अपंग मुलांसाठी विशेष हक्क ; सर्व राष्ट्रांना मान्य आहे कि  शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अपंग मुलांनाही स्वावलंबी आणि मानाचे आयुष्य जगता यावे आणि समाजात मिसळता यावे.


समजून घेऊयात मुलांच्या गरजा आणि अधिकार यातील फरक

समजून घेऊयात मुलांच्या गरजा आणि अधिकार यातील फरक

मुलांसोबत काम करताना बाल हक्काची संकल्पना संपूर्ण माहित असणे, ती समजणे आणि प्रत्यक्षात आणणे याची नितांत गरज आहे.किंबहुना मुलांसोबतच्या प्रेत्येक कामासाठी बाल हक्क हा पाया आहे. ह्या पायावरच आपले काम उभे राहिले तर खऱ्या अर्थाने मुलांचे काम होईल.

खरं तर बाल हक्कांची मूळ संकल्पना ही काही मानवी हक्कांपेक्षा वेगळी नाही. तो मानवी हक्कांचाच एक भाग आहे परंतु आपल्या कुटुंबामध्ये समाजात मूल म्हणजे अजान अज्ञानी आणि परावलंबी समजली जातात. अशा मुलाना हक्क असणे हे शब्दच काहीजणांनी विचित्र वाटतील. जगातील आणि पर्यायाने भारतातील काही मुलांना हे हक्क आपापल्या सुरक्षित समाजात , कुटुंबामध्ये सहज मिळतात. पण कठीण परिस्थितीत जगणाऱ्या अनेक मुलांना हे मिळत नाहीत. अशा मुलांच्या विकासासाठी , भविष्यासाठी हक्क ही संकल्पना जास्त उचित ठरते. अशा मुलांसाठीच बाल हक्क ही संकल्पना पुढे आली. आज जगभरातील बहुतांशी राष्ट्रांनी ही संकल्पना मान्य करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयन्त सुरु केले आहेत.

गरज आणि हक्क यातील प्रमुख फरक 

गरज
हक्क
      ·         गरज म्हटल्यावर पुर्ण होणे /न होणे हे         परिस्थितीवर अवलंबून राहू शकते.
  •                हक्क म्हटल्यावर ते पुर्ण झालेच पाहिजेत असा आग्रह धरता येतो ते अत्यावश्यक ठरते.

  •        गरजा पुर्ण करणे ही कोणाची जबाबदारी ठरत नाही

  •            हक्क पुर्ण करण्यासाठी जबाबदारी ही मुलांच्या पालकांची /शिक्षकांची/ग्रामपंचायतिची /पर्यायाने शासनाची ठरते.

  •           काळ , परीस्थीतीनुसार गरजा बदलतात

  •            हक्क मुलांना सर्वत्र समान असतात.

  •         गरजामध्ये प्राथमिक-पहिली-दुसरी अशी  क्रमवारी लावता येणे शक्य आहे

  •           हक्क मात्र सर्व समान आणि एका पातळीवर असतात. त्याची संपूर्ण पूर्तता व्हावयास हवी.

  •          एखाद्या गावात फ़क़्त काही मुलांच्या गरजा पुर्ण झाल्या असे होऊ शकते.

  •           गावातील / वस्तीतील  प्रत्येक मुलाला हक्क समान आणि सर्वाना मिळालेच पाहिजेत हक्क सर्वाचा विचार करतो भेदभाव करत नाहीत.

संतोष शिंदे :- ९८६९०३०३८२

माझा इमेल :- write2santoshshinde@gmail.com

Sunday, September 22, 2013

सुरुवात ......

सर्वाना झिंदाबाद 
मी  मुलांच्या प्रश्नावर....मुलांशी निगडीत.....मुलांच्या अधिकारांना लक्षात घेऊन....आणि हो..सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्व मोठ्या माणसांची काय जबाबदारी असायला हवी हे लक्ष्य करत मी  लिहिणार आहे आणि हे सर्व  मराठीत ब्लोग लिहायचं  ठरवलंय 
बघुयात कसे जमत ते....
मला खात्री आहे माझ्या पोस्त तुम्हाला नक्की आवडतील....
लवकरच भेटूयात ......
मुलांच्या विश्वात मुलांसोबत एका नव्या दमात!!!!

संतोष शिंदे 
९८६९०३०३८२